गेवराई( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात कसल्या प्रकारची भरीव तरतूद निदर्शनास येत नाही. बीड जिल्हा बारामतीप्रमाणे करण्यात येईल हे अजित दादा चे स्वप्न पूर्ण होईल अशी अर्थसंकल्पात कसल्याही प्रकारची तरतूद निदर्शनास येत नाही. बीड जिल्हा सर्व क्षेत्रात मागास असून अद्याप पर्यंत दळणवळण, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा या क्षेत्रात जिल्हा मागास आहे. इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तरतूद झालेली आहे. परंतु बीड जिल्ह्यात अत्यंत अल्प प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद झाल्यामुळे बीड जिल्हा बारामतीप्रमाणे करण्यात येईल हे अजित दादाचे स्वप्न साकार होऊ शकत नाही.
जिल्ह्यासाठी औद्योगिक, दळणवळण, कृषी, सिंचन क्षेत्रासाठी, शैक्षणिक आदि क्षेत्रात बीड जिल्हा मागास आहे .तरी यापुढे अजित दादा चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरीव तरतूद होणे अत्यंत आवश्यक आहे याबाबत शासनाने गंभीरपणे विचार व्हावा ही विनंती
अनिल बोर्डे
बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष व ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्र गेवराई







