कालच आपण बातमी वाचली नऊ पोलिसांना फाशीची शिक्षा झाली..
हे शक्य झालं एका कर्तव्यदक्ष आणि सतर्क महिला कॉन्स्टेबल यांच्यामुळे
त्या आहेत रेवती संतोषकुमार हेड कॉन्स्टेबल साथानकुलम पोलीस स्टेशन, तामिळनाडू!
रेवती संतोष कुमार यांची साधी पोस्ट आहे परंतु त्यांच्या कर्तव्यदक्षपणामुळे एवढ्या मोठ्या प्रकरणाचा भांडाफोड झाला.
पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मदुराईच्या सत्र न्यायालयाने ज्या ९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली… त्या प्रकरणातील त्या मुख्य साक्षीदार आहेत… त्यांनी सर्व प्रकार पहिला होता.
रेवती यांची साक्ष या शिक्षेत अत्यंत महत्त्वाची ठरली आहे…
आपल्यापेक्षा सीनियर अधिकाऱ्यांसमोर साक्ष देणं धाडसाचं असतं…
सध्या संपूर्ण तामिळनाडूची जनता त्यांच्या या धाडसाचं कौतुक करत आहे….
रेवती यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.. हे लक्षात घेऊन मदुराई सत्र न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला विशेष पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले होते.
तसेच त्यांना सशुल्क रजा Paid Leave देऊन सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.
मदुराई न्यायालयाने आपल्या निकालपत्रात रेवती यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक सुद्धा केले आहे…
जर त्यांनी भीतीपोटी मौन बाळगले असते, तर कदाचित या ९ आरोपींना शिक्षा होणे कठीण झाले असते. खऱ्या अर्थाने त्या या प्रकरणातील ‘रिअल हिरो’ ठरल्या आहेत!
अशा रियल हिरोईनचे कौतुक झालंच पाहिजे







